व.पु.काळेंची आयुष्य बदलून टाकणारी ५१ वाक्ये







व. पु. काळेंची आयुष्य बदलून टाकणारी २१ वाक्ये 


१. गगनभरारीचं वेड


कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही पण गगनभरारीचं वेड हे रक्तातच असावं लागतं. कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही.

=============

२. झुंज


वादळे जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीला घट्ट रुजून राहायचं असतं. ती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघूनही जातात. वादळ महत्त्वाचे नसते. प्रश्न असतो कि आपण त्यांच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा.


=============

३. कॅलेंडर 


भिंतीकडेच पाहत आयुष्य घालवणार्‍या रिकाम टेकड्यांना कॅलेंडर वर कुठलही चित्र चालतं.व्यक्तीमत्व घडवणार्‍या माणसांच्या बाबतीत,तारखांचे चौकोन जास्त सचित्र असतात.प्रत्येक चौकोनावर वेगळं चित्र,वेगळा विचार,वेगळी प्रगती,वेगळं शिखर.


=============

४. संघर्ष कुठपर्यंत? 


आकाशात जेव्हा एखादा कृत्रिम उपग्रह सोडतात तेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या सीमेबाहेर पिटाळून लावेपर्यंत सगळा संघर्ष असतो. त्याने एकदा स्वतः गती घेतली कि उरलेला प्रवास आपोआप होतो. असंच माणसाचं आहे...समाजात विशिष्ट उंची गाठेपर्यंत जबर संघर्ष असतो. पण एकदा अपेक्षित उंचीवर पोहचलात कि आयुष्यात अनेक समस्या ती उंचीच सोडवते.


=============

५. पडावं तर असं!


आपत्ती पण अशी यावी कि इतरांना हेवा वाटावा. व्यक्तीचा कस लागावा. पडायचंच असेल तर ठेच लागून पडून नये. चांगलं २००० फुटांवरून पडावं. म्हणजे माणूस किती उंचावर पोहचला होता हे तरी जगाला कळेल.


=============

६. परिपूर्णता?


जगातील कुठलीच गोष्ट परिपुर्ण नाही. परमेश्वरानं सोनं निर्माण केलं. चाफ़्याची फ़ुलं सुद्धा त्यानंच निर्माण केली. मग त्याला सोन्याला चाफ़्याचा वास नसता का देता आला ? अपुर्णतेतही काही मजा आहेच की..


=============

७. नको असलेला भाग


दगडात मूर्ती असतेच. त्याचा फक्त नको असलेला भाग काढून टाकायचा असतो. आणि मग ह्याच भावनेने निसर्गातील इतर गोष्टींकडे पहा. झाडे, नद्या, वारे, आकाश, जमीन आणि शेवटी माणूस. माणसातही नको असलेला भाग दूर करायला शिका.


=============

८. पशू माणसांपेक्षा श्रेष्ठ


पशू माणसांपेक्षा जास्त श्रेष्ठ आहेत कारण ते INSTINCT वर जगतात...बेदम वजन वाढलंय म्हणून घारीला उडता येत नाही, किंवा एखादा मासा बुडाला असं कधी ऐकलंय का ?


=============

९. समस्या


अनेक समस्या त्यावेळी सुचेल त्या मार्गाने सोडवाव्या लागतात. थोडा अवधी लोटल्यावर मग कायमचा उपाय शोधावा. दुध अचानकपणे म्हणजे आपण तंद्रीत असताना, कोणत्यातरी क्षणी लाट अंगावर यावी त्या वेगाने वर काठापर्यंत येते. चिमटा शोधायला वेळ नसतो. अशा वेळेला पाण्याचा शिडकावा करून ते तिथल्या तिथे शांत करायचं असतं. थांबवायचं असतं. मग सावकाश चिमटा शोधावा, उसंत घेवून ते खाली उतरवावं. तसच काहीसं अनेक समस्यांचं असतं.


=============

१०. प्रोब्लेम्स कुणाला नसतात?


प्रोब्लेम्स कुणाला नसतात? ते शेवटपर्यंत असतात. पण प्रत्येक प्रोब्लेमला उत्तर असतेच.ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा तर कधी माणसे. या तिन्ही गोष्टीं पालिकडचा प्रोब्लेम अस्थित्वात नसतो.


=============

११. समोरच्याच्या दुःखाचे समाधान 


समोरच्या दुःख सांगणाऱ्या माणसाचं जर समाधान करायचं असेल, त्याला दिलासा द्यायची इच्छा असेल तर तो जे बोलतो त्यातलं सत्तर टक्के तुम्हाला ऐकू येता कामा नये. कारण त्याच्या आयुष्यातल्या दुःखाला पुष्कळदा त्याचा मूर्खपणाच कारणीभूत असतो. तो जेव्हा ऐकू येत नाही तेव्हाच सहानुभूती दाखवणं शक्य होतं. तो जे बोलतो ते जर सगळं ऐकू आलं त्यालाच एक झापड मारावीशी वाटते.


=============


१२. आयुष्याचे 'सुयोग्य व्यवस्थापन'


जेव्हा अडचणीत असाल तेव्हा प्रामाणिक रहा. जेव्हा आर्थिक परिस्थती चांगली असेल तेव्हा साधे रहा. जेव्हा एखादे पद किंवा अधिकार असेल तेव्हा विनयशील रहा. जेव्हा अत्यंत रागात असाल तेव्हा शांत रहा. यालाच आयुष्याचे 'सुयोग्य व्यवस्थापन' असे म्हणतात.


=============

१३. पळू नका


प्रश्नांपासून नेहमीच पळता येत नाही. कधी न कधी ते पळणाऱ्याला गाठतातच. पळवाटा मुक्कामाला पोहचत नाहीत. मुक्कामाला पोहचतात ते सरळ रस्तेच.


=============

१४. पाठीची खाज


पाठीला चमत्कारिक ठिकाणी खाज सुटावी , आपला हात वर पोहचत नाही व दुसर्याला नक्की जागा सापडत नाही अशी अवस्था जीवनात ही बऱ्याचदा होते.


=============

१५. माफी

 

माफी मागितल्याने तुम्ही चुकीचे होता आणि समोरची व्यक्ती बरोबर, हे कधीही सिद्ध होत नाही. माफीचा खरा अर्थ तुमचं नातं टिकवण्याची लायकी त्या दुसऱ्या व्यक्तीपेक्षा तुमच्यातच जास्त आहे.


=============

१५. खर्च-हिशोब


खर्च झाल्याचं दुःख नसतं. हिशोब लागला नाही कि त्रास होतो.


=============

१६. गैरसमज


गैरसमज हा कॅन्सरसारखा असतो. तिसऱ्या अवस्थेला पोहचल्यावर तो आपलं स्वरूप प्रकार करतो.


=============

१७. शस्त्रक्रिया. भीती-अभिमान 


शस्त्रक्रिया होण्यापूर्वी प्रत्येक रोगी घाबरलेला असतो. बरा झाल्यावर शिवलेली जखम तोच कौतुकाने दाखवत सुटतो.


=============

१८. अपेक्षा-ऐपत


घेणाऱ्याच्या अपेक्षेपेक्षा देणाऱ्याची ऐपत नेहमीच कमी पडते.


=============

१९. अपयशाची भीती 


माणूस अपयशाला भीत नाही. अपयशाचं खापर फोडायला काहीच नाही मिळालं तर? याची त्याला भीती वाटते.


=============

२०. खरी शोकांकिका:


बोलायला कोणीच नसणं यापेक्षा आपण बोललेलं समोरच्यापर्यंत न पोहचणं हि शोकांकिका जास्त भयाण.


=============

२१. कौतुकाची खुमारी


कौतुकाला थोडी हेव्याची किनार असल्याशिवाय त्याला खरी खुमारी येत नाही.


=============

२२.

सुरक्षितता आणि स्थैर्य शोधणाऱ्या माणसांना प्रारंभी करार हे वरदान वाटतं आणि करार संपेपर्यंत स्वास्थ्याची चटक लागून आपण गुलाम कधी झालो हे कळत पण नाही. 

 २३.

जेव्हा अभिरुची म्हणजे काय हे समजायला लागतं  तेव्हा माणसाचा जन्म होतो. 

 २४.

रात्र म्हणजे कालचा फळा  पुसून लख्ख करणारं डस्टर. त्या स्वच्छ फळ्यावर आपण कालचेच धडे का लिहायचे? – जो नव्या दिवसाला कोऱ्या मनाने सामोरे जातो, नवा मजकूर लिहितो, तो लेखक नसेल,पण प्रतिभावंत असतो. 

 २५.

जो स्वतः कशातच हरवत नाही, तो माणूस कसला?

 

 २६.

सर्वात जीवघेणा क्षण कोणता?  खूप सद्भावनेने एखादी शुभ गोष्ट करायला जावं आणि स्वतःचा काही अपराध नसतांना पदरी फक्त वाईटपणाच यावा, सद्हेतूंचीही शंका घेतली जावी, हा!   

 २७.

प्रश्नाला ‘हेतू’ चिकटल्याचा भास निर्माण झाला की उत्तराला ‘ सेतू’ आलाच.  

 २८.

माणसाने आजूबाजूच्या रोषनाईकडे पाहू नये किंवा विझवलेले  नयेत. ज्याला चालायचं आहे त्याने आपल्या हातातला दिवा जपायचा असतो. 

२९.

‘निसर्ग आणि माणसाचं मन यात संवाद असता तर कृत्रिम गर्भधारणा नावाचा प्रकारच संभवला नसता, किंवा बलात्कारातून वंश वाढला नसता.’

 ३०.

पुरुषाचं लग्न झालं म्हणजे त्याला आई दुरावते आणि त्याला मूल झालं म्हणजे बायको दुरावते. 

 ३१.

माणसं  माणसांना भेटतच नाहीत. वेगवेगळे हेतू एकमेकांसमोर येतात.सावल्या सावल्यांना भेटतात. म्हणूनच हेतुपूर्तता झाली की माणसे एकटी पडतात. 

 ३२.

प्रतिक्षेशिवाय उत्कटतेला धार येत नाही. 

 ३३.

आपत्ती पण अशी यावी की त्याचा पण इतरांना हेवा वाटावा, व्यक्तीचा कस लागावा. पडून पडायचं तर ठेच लागून पडू नये. चांगलं दोन हजार फुटांवरून पडावं. माणूस किती उंचावर पोचला होता हे तरी जगाला समजेल. 

 ३४.

सगळे वार परतवता येतात. अहंकारावर झालेला वार परतवता येत नाही आणि पचवताही येत नाही. 

 ३५.

ध्येय्यासाठी वेडे होणारे पुरुषच. प्रेम करतानाही बायका हातचं राखून प्रेम करतात आणि त्यांनी जेवढं दिलंय त्याला आपण ‘सर्वस्व बहाल केलंय रे’ असं म्हणत पागल होतो. 

३६.

पोरकेपणा  म्हणजे काय? आपली व्यथा इतरांना न समजणं हाच पोरकेपणा. 

३७.

प्रामाणिकपणा शिकवण्याची बाब नव्हे. तो रक्तात असावा लागतो. त्यात टक्केवारी नसते. तो असतो किंवा नसतो.

३८.  

खर्च झाल्याचं दुःख नसतं . हिशेब लागला नाही की त्रास होतो. 

 ३९.

बायको कशी हवी राव? आपण बिथरलो तर आपल्याला सावरणारी हवी, स्वतःच बिथरणारी नको. थोडक्यात म्हणजे पेपर वेट सारखी हवी. खालचे कागद फडफडतील, पण ती स्वतः गडगडणार नाही, चळणार नाही आणि खालचे कागदही उडू देणार नाही. 

 ४०.

एखादी वस्तू, मनात कोणताही संभ्रम निर्माण न करता आवडते, तेव्हाच ती स्वीकार करण्यायोग्य मानावी . ती वस्तू म्हणजे एखादा विचारही असेल. 

 

४१.

तुम्ही नुसतं गुणी असून चालत नाही. ते गुण खळबळ न करता मान्य करणारा समाज तुमच्याभोवती जमणं  याला महत्व आहे.  

 ४२.

माणूस केव्हा फसतो सांगू? आपल्याला काय मिळवायचं होतं  हे जेव्हा माणसाला समजत नाही तेव्हा तो फसलेला  असतो. 

 ४३.

स्वतःचे अनुभव उगीचच इतरांना सांगू नयेत. इतरांना एक तर ते अनुभव खोटे वाटतात किंवा आपण खोटे आहोत, असं वाटायला लागतं

४४.

गैरसमज हा कॅन्सरसारखा असतो. तिसऱ्या अवस्थेत पोचल्यावर तो आपलं स्वरूप प्रकट करतो. 

४५.

‘मरणाची भीती का वाटते सांगू का ?’ एकट्याने जायचं म्हणून वाटते. बरोबर जिवाभावाचे दोन चार मित्र असते तर मरणाचं काही वाटलं नसतं . 

४६.

प्रत्येक माणसाच्या मनात त्याचं  एक जग असतं. ते उद्ध्वस्त होऊ नये ही त्याची धडपड. जे बाहेरचं  जग मानतात ते आतून फुटतात. जे बाहेरचं  जग उद्ध्वस्त झालं तरी चालेल म्हणतात ते सुखी. 

 ४७.

अस्थिर माणसे जशी बारमध्ये सापडतात तशी सिद्धिविनायकाच्या रांगेतही. अर्थहीन श्रद्धाही व्यसनासारखीच. जित्याजागत्या माणसांशी संवाद संपला की हे तकलादू आधार शोधावे लागतात. 

 ४८.

गप्पा म्हणजे संवाद नव्हे. संवादाचं नातं विचारांशी. 

ग्रंथांशी  मैत्री म्हणजे विचारांची आराधना. 

निर्भेळ विचार म्हणजे आत्मविश्वास. 

बुद्धीची उपासना हीच भक्ती. भक्तीने कृती हीच संस्कृती. 

 ४९.

स्वाभाविक गोष्टींवर चिडण्यात अर्थच नसतो. भुंगे जमावेत म्हणून कमळ  फुलत नाही,आणि एखादं  कमळ पकडायचं असं ठरवून भुंगे भ्रमण करीत नाहीत. फुलणं  हा कमळाचा धर्म, भुलणं हा भुंग्याचा धर्म. जाणकारांनी, रसिकांनी कमळाकडे पाहावं, भुंग्याकडे पाहावं आणि फुलावं कसं आणि भुलावं कसं  हे शिकावं. 

५०. 

चालणारा माणूसच फक्त पायाखाली कीड-मुंगीची हत्या होत नाही ना हे बघतो. धावणारा माणूस फक्त तुडवण्याचं काम करीत असतो. 

५१. 

ज्या कार्यात, चळवळीत प्रत्येकाला निश्चित स्वरूपाचं काम करावं लागतं ती चळवळ सगळ्यांना नकोशी असते. 

 

=============

स्कॉलरशिप ५ वी तयारी 























Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.